शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले...
2
मला माझे ९०० रुपये परत हवेत; मालेगाव बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेल्या समीर कुलकर्णींची मागणी 
3
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण निकाल: सर्व सात आरोपींची निर्दोष मुक्तता, कुणावर होते काय आरोप?
4
ट्रम्प यांचा भारतावरील टॅरिफ बॉम्ब अमेरिकन लोकांवरच उलटणार? औषधांच्या किंमती वाढण्याचा धोका
5
"राजकीय बदनामीच्या षड्यंत्राचा पर्दाफाश, काँग्रेसने हिंदूंची माफी मागावी", भाजपाचा हल्लाबोल
6
"हिंदू दहशतवादी नाही, शाहांचं विधान अन् आज कोर्टात आरोपींची निर्दोष सुटका हा फक्त योगायोग"
7
१७ वर्षांनी आरोपी निर्दोष सुटले, मग दोषी कुठे आहेत?; मालेगाव स्फोट खटल्याच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह
8
धक्कादायक! ८ वर्षांच्या चिमुकल्याच्या गुप्तांगावर शिक्षिकेनं फवारलं कॉलीन; नालासोपाऱ्याच्या शाळेला टाळं
9
लॉर्ड्स मैदानावर खेळला शाहिद कपूर, इंग्लंडच्या माजी खेळाडूंसोबत शेअर केले Photo
10
Malegaon Blast Case Verdict : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटताच प्रज्ञा सिंह भावूक, अश्रू अनावर, म्हणाल्या - 'भगवा जिंकला...'
11
मालेगाव बॉम्बस्फोट; कधी अन् कसा झाला? किती लोक मृत्यूमुखी पडले? जाणून घ्या पूर्ण टाईमलाईन
12
पाकिस्तानने चीनमधून रिमोट सॅटेलाईट प्रक्षेपित केला, CPEC वर लक्ष ठेवणार
13
Malegaon Blast Case Verdict: प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
14
बदला घ्यायला आली...! नागाला चुकून मारलेले, नागीण नाग पंचमीच्याच दिवशी घरात आली...
15
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
16
खाजगी बँकेचा UPI ला धक्का? आता प्रत्येक व्यवहारावर लागणार शुल्क, 'या' तारखेपासून नवा नियम लागू!
17
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
18
KBC चा पहिला करोडपती आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा नवरा, 'कमळी' मालिकेत साकारतेय भूमिका
19
जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश 'या' ५ देशांकडून करतोय मोठ्या प्रमाणात शस्त्र खरेदी! कारण काय?
20
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"

सदस्यांनी ‘व्हिजन’ ठेवून काम करावे : चंद्रकांतदादा पाटील-- शिवाजी विद्यापीठात विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 02:13 IST

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर निवडून गेलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी विद्यापीठ विकासाबाबत एक आराखडा तयार करावा,

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांवर निवडून गेलेल्या नवनिर्वाचित सदस्यांनी विद्यापीठ विकासाबाबत एक आराखडा तयार करावा, त्याबाबत नवे ‘व्हिजन’ डोळ्यासमोर ठेवून भविष्यातील कामकाजाची वाटचाल करावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीमध्ये प्राचार्य, नोंदणीकृत पदवीधर, विद्यापीठ शिक्षक, संस्थाचालक, अभ्यास मंडळे आणि शिक्षक अधिसभा यात विकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचा तसेच अधिकार मंडळावर राज्यपाल नियुक्त सदस्यांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते शनिवारी सायंकाळी येथील एका हॉटेलच्या हिरवळीवर पार पडला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील हे होते.

मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळाच्या निवडणुकीत सर्वांनी एकोप्याने व विश्वासाने काम केल्यामुळे बहुमत मिळणार हे निश्चितच होते. डॉ. संजय डी. पाटील यांनी सर्वांना एकत्र करून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नेतृत्वगुण दर्शविताना तिन्ही जिल्ह्यांत जागा वाटप करताना न्याय दिला, त्याचा परिपाक म्हणून हे विकास आघाडीला बहुमत मिळाले आहे.

अध्यक्षीय भाषणात डॉ. डी. वाय. पाटील यांनी, विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर निवडणुकीत वर्चस्व मिळवताना डॉ. संजय डी. पाटील यांनी दाखविलेल्या ऐक्याच्या कौशल्याबाबत कौतुक केले.यावेळी आघाडीचे कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांचेही भाषण झाले. यावेळी प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन प्राचार्य महादेव नरके यांनी केले. यावेळी महापौर हसिना फरास, प्राचार्य अभयकुमार साळुंखे, प्रा. शंकरराव कुलकर्णी, अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, बाबा सावंत, प्रा. डी. यु. पवार, डॉ. डी. आर. मोरे, प्रताप ऊर्फ भैया माने, आदी उपस्थित होते.विद्यार्थी हाच केंद्रबिंदूआघाडीच्या माध्यमातून विविध अधिकार मंडळांवर सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्हीही जिल्ह्याला जागा वाटप करताना न्याय दिल्यानेच हे यश मिळवता आले. मतदारांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी आम्ही विद्यार्थी हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून पार पाडू, अशी ग्वाही विद्यापीठ विकास आघाडीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांनी दिली.शिवाजी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळांवर विजयी झालेल्या विकास आघाडीच्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला. शनिवारी झालेल्या या कार्यक्रमात आघाडीचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांचा सत्कार पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. एल. जी. जाधव, प्रा. डी. यु. पवार, डॉ. डी. आर. मोरे, प्रा. क्रांतीकुमार पाटील, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, महापौर हसिना फरास, प्रा. अभयकुमार साळुंखे, डॉ. जे. एफ. पाटील, आदी उपस्थित होते.